भिसे वाघोली (ता. जि. लातूर) येथील रहिवासी कु.शितल व्यंकट वायाळ हिने स्वतःच्या लग्नासाठी वडीलांकडे पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली.
तीच्या कुटुंबियांना भेटून माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सांत्वन केले व काँग्रेस पक्षा तर्फे 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली, तसेच आपल्या कुटुंबाच्या व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत असा धीर दिला.
यावेळी आ. त्रिंबक नाना भिसे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जि. प.सदस्य धीरज देशमुख, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव अमर खानापुरे, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव बेद्रे इत्यादी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment